Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मराठ्यांनी हक्कासाठी लढायला सज्ज व्हावे - मनोज जरांगे पाटिल

Responsive Ad Here

वडीगोद्री प्रतिनिधी भीमराव हारे

       शासन कोरोनाच्या नावाखाली समाजाचे प्रश्न दडपून टाकण्याच्या तयारीत आहे.या सरकारने मराठा आरक्षणाचा जाणिवपूर्वक खेळखंडोबा केला आणि आता मराठा समाजाला नादी लावण्यासाठी बैठकांचे गुऱ्हाळ सुरू केले आहे.राज्यपालांकडे चाललोत व राष्ट्रपतीकडे जाणार हि नुसती बेगडी पळापळ सरकारने सुरू केली आहे.म्हणून मराठा समाजाने आता लढण्यासच सज्ज व्हावे.यातच समाजाचे हित आहे,असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्यातील तरुणांना केले आहे.


     केंद्रातील आणि राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी व पुढाऱ्यांनी एकजुटीने मराठा आरक्षणाचा घात केला असून,तरूणांच्या भविष्यावर नांगर फिरण्याचे महापाप या राज्यकर्त्यांनी केले आहे.परंतु आता मराठा तरूणांचा तळतळाट उफाळून बाहेर पडणार आहे.त्यांची झळ पुढिल काळात आम्ही सुध्दा राज्यकर्त्यांच्या भविष्याला बसवणार आहोत.त्या दृष्टीने समाज पावले उचलणार आहेच आणि मराठा समाजात अन्याय झाल्याची जी खदखद आहे तीचे हि एकजूटीत रूपांतर होत आहे. 

   जर या मागण्या मान्य करायच्या असतील तर मराठा समाजाने लढा उभा करावा.मराठा आरक्षणाचा अध्यादेश सरकारने तातडीने काढावा.कोपर्डीच्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी.एसईबीसीमधून विविध विभागात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्त्या देण्यात याव्यात.मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना शासकीय नोकरीत देण्यात यावी.कोरोना काळातील विद्यार्थ्यांच्या फिस परत करण्यात याव्यात.

    या मागण्या आज आणि उद्याच्या होणार्‍या कॅबिनेट बैठकीत मंजूर करण्यात याव्यात आणि सरकारने जर हे मान्य नाही केले तर मराठ्यांनी लढण्यास सज्ज व्हावे,असे आवाहन मनोज जरांगे पाटिल यांनी केले आहे.