दत्ता शेळके जालना प्रतिनिधी
जालना तालुक्यातील मागील पंधरा दिवसात जोरदार झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असुन सोयबीन , कापुस , तुर , मुग , उडिद , भुईमूग , ऊस व फळबाग पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच पंचनामे न करता शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख नुकसान भरपाई मदत म्हणून जाहीर करावी या मागणीचे निवेदन जिल्हा अधिकारी यांना मनशे च्या वतीने देण्यात आले होते मात्र यांची कोणतीच दखल घेतली नसल्याने दि:17 स्पटेबर रोजी सकाळी दहा च्या सुमारास नेर येथे जल समाधी आंदोलन करण्यात आले यावेळी मंडळ अधिकारी एन के कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले यावेळी कृष्णा खलसे जालना तालुका अध्यक्ष,
श्रीकांत राठोड ता उपाध्या, कृष्णा पिसोरे तालुका उपाध्यक्ष,राम कातकडे तालुका उपाध्यक्ष, ऋषिकेश कावळे,मंच्छिद्र चव्हाण,रोहीत व्यव्हारे , विलास घाटे,भाऊ कर्हाळे, ओंमकार गवळी, महादेव चोरमारे, शिवाजी दुगाने, दिपक बावणे, जिवा जाधव, गजानन गायके, रामेश्वर गाडेकर, संतोष मांदळे, रमेश मांदळे, ज्ञानेश्वर राठोड, आभिषेक इरमले, महादेव मेहेत्रे, पंडीत, शंकर आढे, रामेश्वर जाधव, गजानन राठोड, आकाश सुपेकर या सह शेकडो कार्यकर्ते उपास्थित होते
