संजय पवार अमरावती
शेतकऱ्यांना अडचणीची ठरलेली शासनाची ई -पिक पाहणी मोहीम सहज चर्चेचा विषय ठरला आहे, शेतकऱ्यांना या मोहिमेचे महत्त्व कळावे व त्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी कृषिकन्या तन्वी काकड ईणे ग्रामीण भागात जाऊन (नांनोरी )या गावामध्ये जाऊन कार्यशाळेचे आयोजन केले यात उपस्थित शेतकऱ्यांना तनवी काकड ईने योग्य पद्धतीने मार्गदर्शन केले.
चांदूर बाजार जवळील तालुक्यातील सर्वाधिक शेतकरी संख्या असलेल्या नानोरी येथील गावात ई पिक पाहणीचे आयोजन करून शेतकऱ्यांना त्यांचे महत्त्व पटवून देण्यात आले व तसेच ज्या शेतकऱ्याकडे अँड्रॉइड मोबाइल आहे त्यांना त्यांना ई पिक पाहणी बाबत तांत्रिक बारकावे समजावून सांगितले व त्यांच्याकडे नाहीत त्यांना मोबाईल धारकाकडून सहकार्य घेण्याचे आवाहन केले .
,कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषिकन्या तनवी काकड ईला पी आर पोटे पाटील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य पी .बी देशमुख तसेच वनस्पती रोग शास्त्र प्राध्यापक राहुल कळसकर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच या कार्यक्रमासाठी शेतकरी सौरभ मानकर सुमित भगत,कमलदास वानखडे ,श्रीराम आगरकर ,आदी शेतकरी उपस्थित होते.
