१७ आॕक्टोबर रोजी आडगांव ता.एरंडोल येथील कै.रविंद्र प्रभाकर महाजन व कै.महेंद्र उखर्डु पाटील यांच्या अंगावर विज पडुन त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला. यावेळी जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.गुलाबरावजी पाटील व आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी मयतांचा कुटुंंबियांची त्वरित भेट घेऊन कुटुंंबियांना तात्काळ शासकीय मदत मिळवुन देण्याचे ठोस आश्वासन दिले होते. तर आज १७ नोव्हेंबर रोजी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या पाठपुराव्याने मयतांचा कुटुंंबियांना प्रत्येकी ४ लक्ष रूपये असे एकुण ८ लक्ष रूपये दोन्ही कुटुंंबियांना आर्थिक मदत मिळवुन दिली. यावेळी कुटुंंबियांना धनादेश देतांना प्रांताधिकारी विनयजी गोसावी, तहसिलदार सौ.खेतमाळीस मॕडम, मा.जि.प.उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ ,,(नाना) आमले, शिवसेना तालुकाप्रमुख वासुभाऊ पाटील, मा.श्री.जगदीशदादा आदी उपस्थित होते.✍️✍️✍️ गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी

