जळगाव प्रतिनिधी
भारतीय कम्युनिस्ट पार्टी किसान संघर्ष समिती टक्कर रे तर्फे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य धरणे आंदोलनात मागणी
. शेतकरी विरोधी मोदी सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करा व कामगारविरोधी धोरणे मागे घ्या जळगाव जिल्हा दुष्काळी जाहीर करा म्हणून ९ऑगस्ट क्रांती दिनी भव्य धरने आंदोलन जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय कम्युनिस्ट पार्टी किसान संघर्ष समिती व तर्फे करण्यात आले. त्यावेळी आंदोलनाचे नेतृत्व कामगार नेते अमृतराव महाजन व कम्युनिस्ट पार्टीचे सेक्रेटरी लक्ष्मण शिंदे व कामगार नेते अमृतराव महाजन शेतकरी पदाधिकारी डॉक्टर आशिष जाधव ग्रामपंचायत कर्मचारी संघाचे संतोष खरे., अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे गुप्त यारी तडवी, कल्पना सैंदाणे आदींनी केले या आंदोलनात मोदी सरकारच्या काळात वाढत चाललेल्या भरमसाठ महागाई निषेध करण्यात आला निषेध करण्यात आला तसेच सरकारच्या शेतकरी विरोधी तीन कायदे कृषी कायदे व तसा कधीच कामगार सहिता रद्द करा. अशी आग्रही मागणी करण्यात येऊन *जळगाव जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा* अशी मागणी करण्यात आली असे संघटनेचे प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले पत्रकात म्हटले आहे की .
मोदी सरकार पेट्रोल डिझेल गॅस खाद्य तेल .खते.. इंधन कृषी पयोगी कीटकनाशके बांधकाम साहित्य व जीवनावश्यक औषधी यांची निर्दयपणे भाववाढ करीत आहे.. त्यात देशातील तळागाळातील जनता होरपळून निघत आहे म्हणून महागाई आणि शेतकरी व कामगार विरोधी धोरणाचां निषेध करून .सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेऊन शेतकऱ्यांचे आठ महिन्यापासून चालवलेल्या आंदोलनाला न्याय द्यावा. कामगार विरोधी संहीता मागे घेऊन पूर्वीचे कामगारांचा हक्का चे सर्व कायदे शाबूत ठेवावेत. त्यात सर्व आसंघटित कर्मचारी कामगार शेतकरी शेतमजूर यांना दरमहा ५०००₹ पेन्शन कायद्याची भर घालावी
त्यावेळी जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना अमृतराव महाजन यांच्या नेतृत्वाखालील सर्व श्रीमती कल्पना सैंदाणे सुलेखा पाटील, विद्या देवी बाविस्कर संतोष खरे सुभाष कोळी बळीराम धीवर दिलीप चावरे रतिलाल पाटील यांच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले निवेदनात मागणी केली आहे की, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एक हेक्टरी पंचवीस हजार रुपये म दत ध्या व महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना त कामे काढा.
covid19काळात शेतकरी शेतमजूर व्यवसायिक यांच्या खात्यावर दरमहा साडेसात हजार रुपये टाकावेत. किसान सन्मान योजना चे मानधन दरमहा पाच हजार रुपये करावी आरोग्यासाठी च्या अंदाजपत्रकीय तरतूद वाढवण्यात येऊन औषध उपचार व इलाज मोफत करावे .जिल्हा परिषद व सर्व शाळा अंगणवाड्या सुरू करा मोदी सरकारची कामगार विरोधी धोरणे हाणून पाडा . कामगार विरोधी कायदे रद्द करा कर्मचाऱ्यांना२१ हजार रुपयेदर महा पगार द्या सेवानिवृत्त अंगणवाडीसेविकां मदतनिस त्यांना एकरकमी सेवानिवृत्ती लाभाची ची रक्कम त्वरित द्या.
अंगणवाड्या चे नादुरुस्त व गॅरंटी/ वॉरंटी संपलेले मोबाईल परत घ्या. नवीन मोबाईल पूरवा.पोषण ट्रॅकर चे मराठीमध्ये ॲप करा. पोषण आहार नोंदणी रजिस्टरवर भरण्याची मुभा द्यावी. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पगार वाढ जाहीर करा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासन निर्णय प्रमाणे 10 ऑगस्ट 2020 प्रमाणे पगार वाढ व फरक द्या आशा गटप्रवर्तक यांना मार्चपासून रखडलेली मानधनवाढ अदा क रा आदी सादर करण्यात आले आंदोलनात विजया बोरसे वैशाली पाटील देव बाला महाजन पाटील, शारदा पाटील, चमेली बाई पाटील मीनाक्षी सोनवणे मनीषा पाटील अनिता सावले ठगूबई पाटील प्रमिला पाटील ग्रामपंचायत कर्मचारी महासंघचे सुरेश पाटील भास्कर पाटील पांडुरंग पाटील मच्छिंद्र पाटील मुकेश पावरा शांताराम पाटील राजेंद्र ठाकूर ,रामचंद्र कोळी, रवींद्र पाटील ,भास्कर पाटील पांडू सोनवणे श्री कला ल आदी शंभर कर्मचाऱ्यांचा समावेश होता.