योगेश नागोलकार ता.प्रतिनिधी पातूर
राहेर:पातुर तालुक्यातील चान्नी रस्त्यावरील उमरा जवळ ३ सप्टेंबर रोजी 407 गाळी फसली तसेच रस्त्यावर खड्डेच खड्डे असल्याने वाहन चालकांना ही खुप दिवसा पासून त्रास सहन करावा लागत आहे.पिपंळखुटा हून सोयाबिन भरलेला हा 407 गाडी ही उमरा मार्गे खामगावला जात होती अनेक दिवसांपासून या या रस्त्यावर वाहने फसत आहेत.तरी सुद्धा प्रशासनाचे या
पातुर तालुक्यातील या रस्त्यावर लक्ष देणे गरजेचे ठरत आहे.23 सप्टेंबर रोजी सुद्धा दोन ट्रक फसले होते चान्नी-सस्ती मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती.हा ट्रक अकोल्या हून खंताचा माल घेऊन चान्नी कडे जात होता लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अन्यता आंदोलन करण्यात येईल असा ईशारा पिपंळखुटा, चान्नी, उमरा,पांग्रा राहेर,या गावकऱ्यांनी दिला आहे.
