शेख सज्जात शेख करामत लोणार प्रतिनिधी
शेतकरी विरोधी मानसिकतेच्या भाजपा सरकारने शेतकऱ्यांसाठी घातक ठरणारे, काळे कायदे पारित केले.या काळ्या कायद्यांद्वारे साठेबाजांचा फायदा होऊन, शेतकऱ्यांना पुरते डबघाईस नेण्याचा घाटच केंद्र सरकारने रचल्याचा दिसत आहे. शेतकऱ्यांना, कामगारांना, व बेरोजगारांना गेल्या ७ वर्षांपासून मानसिकरित्या खचविण्याचे कामच भाजपा सरकारने केले आहे.
भाजपा सरकारच्या काळ्या कायद्यांविरोधात, प्रचंड आक्रोशासहित ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. रॅली चे नियोजन कॉग्रेस तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य राजेश मापारी, शहर अध्यक्ष नितीन शिंदे यांनी केले. नगर परिषद गट नेते भूषण मापारी, नगर अध्यक्ष सौ.पुनम मनिष पाटोळे, उपाध्य्क्ष बादशा सेठ, साहेबरावजी पाटोळे , पाणीपुरोठा सभापती आबेद खान, नगर सेवक सतिष राठोड, गजानन खरात,गुलाब सरदार, शेख रऊफ , संतोष मापारी, समाज सेवक सिध्देश्वर दहातोडे, पंढरी चाटे, माजी नगर सेवक शेख करामत शेख गुलाब, गणेश घायाळ, शेख समद, गोपी आखाडे, रनबावरे मामा, अतिक कुरेशी,अंबादास ईगळे, NSUI जिल्हा सरचिटनिस शेख जुनेद शेख करामत , समाधान मापारी,सोशल मीडिया चे मोसिन शाह, ओम पाटोळे, सागर डागर,अश्विन दीक्षित, तोसिफ कुरेशी, सागर मापारी, ऋषिकेश पुंड, अमोल सोनूने, जुबेर चौधरी,आदी कार्यकर्ते नगर सेवक, शेतकरी बांधव उपस्थित होते.
