शिवदास सोनोने प्रतिनिधी
अजिंक्य मानल्या जाणाऱ्या बलाढ्य इंग्रज फौजेची इभ्रत जगाच्या वेशीवर टांगणाऱ्या आणि इंग्रज अधिकाऱ्यांना गुडघे टेकायला भाग पाडणाऱ्या तसेच इंग्रज सैन्यांना सळो की पळो करून त्यांना रणांगणात अक्षरशा कापून काढणाऱ्या आद्यस्वातंत्र्यसेनानी छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांची ३ डिसेंबर रोजी 244 वी जयंती अाहे. ज्या महायोद्याने स्वतर्तृत्वावर शून्यातून विश्व निर्माण केले, ज्या पेशव्यांनी हे भारत राष्ट्र देशोधडीस लावायचे षड्यंत्र रचले होते त्या पेशव्याला छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांनी कोकणात पळून जाण्यास भाग पाडले.
इंग्रज फौजा हळूहळू भारतभर पाय पसरवताहेत याचा गांभीर्याने विचार करून स्वकर्तृत्वावर इंग्रजांशी दोन हात करणारा लढवय्या त्यांच्या हयातीत एकही युद्ध कधीही हरला नाही असे एकमेवाद्वितीय ठरलेले, छत्रपती शिवरायानंतर स्वताचा राज्याभिषेक करून घेणारे ज्यांना भारताचा नेपोलियन बोनापार्ट म्हणून ओळखले जाते ते म्हणजेच धुरंदर लढवय्ये छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर होत. इंग्रजांच्या विरोधात सर्वप्रथमता तलवार उपसून सलग एकूण १८ लढायांमध्ये इंग्रजांना हरवून जिंकणारा महायोद्धा, इंग्रजांना गुडघे टेकायला भाग पाडून सळो की पळो करून सोडत, इंग्रजांना रणांगणात कापून काढणाऱ्या आद्यस्वातंत्र्यसेनानी छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांची जयंती प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांतील गावगाड्यात, वाड्यावस्तीवर जिथे शक्य आहे तिथे रविवार दि.३ डिसेंबर साजरी करून छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांचा इतिहास तळागळापर्यंत पोहचवण्यासाठी यशवंत सैनिकांनी कंबर कसावी. मोडक्या-तोडक्या भाषेत का होईना पण त्यांचा दैदिप्यमान आणि गौरवशाली इतिहास अखंड भारतभरातील प्रत्येक माणसाच्या मनामनात आणि मस्तका-मस्तकात गिरवा.
तरच माझ्या छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांना खरे अभिवादन ठरेल. नुसतंच सोशल मिडीयावरती फोटो इमेजेस बनवून व्हायरल केल्यानेच जयंती साजरी होते अथवा अभिवादन ठरते असे नाही तर लोकांच्या मस्तकात आणि मनामनात जर महाराजांचा इतिहास गिरवला तर तो इतिहास जिवंत राहतो आणि पुन्हा दुसरा इतिहास घडवण्यासाठी त्याच त्वेषाने त्याच उर्मीने त्याच उमेदीने सळसळत्या रक्ताचे वारसदार असणारे यशवंत युवा सैनिक पुन्हा अन्यायाच्या विरोधात लढायला तयार होतील.
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!

