प्रतिनिधी एरंडोल गणेश महाजन
एरंडोल येथे दिनांक ०५/०५/२०२१ रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर हिंसाचार सुरू केले आहे.तरी तो हिंसाचार थांबवण्या करिता व भाजपा कार्यकर्त्यांना सुरक्षा प्रदान करून राज्यात शांतता व कायदा सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी तहसीलदार एरंडोल श्रीमती.अर्चना खेतमाळीस यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनावर तालुकाध्यक्ष मच्छिंद्र पाटील,श्री. अशोक चौधरी,माजी नगराध्यक्ष रविंद्र महाजन, तालुका सरचिटणीस अमोल जाधव ,तालुका उपाध्यक्ष वाल्मीक सोनवणे, अजेंद्र पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रशांत महाजन यांच्या सह्या आहेत.
