जालना प्रतिनिधी दत्तात्रय शेळके
महाराष्ट्र नवनिर्माण सेना जालना जिल्ह्याच्या वतीने तसेच परतूर मंठा तालुक्याच्या वतीने दिनांक 14 जून सोमवारी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे यासारख्या गंभीर परिस्थिती रक्तदानाचे महत्त्व सगळ्यांनाच कळालेले आहे.
म्हणून या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त तरुण पिढीने सहभाग घेऊन रक्तदान करावे कारण त्यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो व त्याचे फळ आपल्याला मिळतेच असे आवाहन मनसे जालना जिल्हा अध्यक्ष माननीय प्रकाश बापू सोळंके यांनी केले आहे शिबिराचे उद्घाटन माननीय भाऊसाहेब जाधव उपविभागीय अधिकारी परतूर तसेच माननीय डॉक्टर नवल साहेब वैद्यकीय अधिकारी परतूर तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी परतूर मंठा तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त रक्तदान करणाऱ्या तरुणांशी संपर्क करावा तसेच शिबिराच्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन माननीय प्रकाश बापू सोळुंके यांनी केले आहे ठिकाण शासकीय विश्रामगृह परतुर परिसर
