प्रतिनिधी जळगाव
तळागाळातील जनतेचे प्रश्न नेहमी सोडविण्यासाठी जागरूक असणार्या ,परखड, बेधडक, महिला नेतृत्व सौ.कल्याणीताई वाघमोडे यांच्या महाराष्ट्रभर असणार्या कार्याला सलाम कल्याणी ताई वाघमोडे या उच्च शिक्षित इंजिनिअर-एमबीए असून प्रभावी वक्तृत्व असल्याने त्या जनतेला नेहमी संबोधित व जागृती करत असल्याने महाराष्ट्रात चांगल्या परिचयाच्या आहेत.आपल्या लेखणीच्या माध्यमातून नेहमी आवाज उठवून, जागृती करणार्या, इतर महिलांना प्रेरणा देणार्या कल्याणीताई वाघमोडे यांच्या क्रांतिकारी विचारांना अधिक बळकटी मिळो. अन्यायाविरुध्द आवाज उठवणाऱ्या आणि सत्यता परखड पणे मांडणाऱ्या हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
महाराष्ट्रात ओबीसी,धनगर समाज मोठ्या संख्येने अस्तित्वात आहे .धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी अहिल्या क्रांती प्रतिष्ठान व क्रांती शौर्य सेना च्या माध्यमातून महिलांना २०१५ पासून पहिल्यांदाच महाराष्ट्रात महिला नियोजित जयंती उत्सव मधून महिलांना व्यासपीठ निर्माण केले आहे.सकल धनगर समाजाच्या वतीने नागपूर, मुंबई, पंढरपूर, बारामती असे अनेक मोर्चे, आंदोलने कल्याणी ताई वाघमोडे यांनी केली आहेत.
धनगर आरक्षण मुद्द्यावर महिला नेतृत्व म्हणून त्यांनी महाराष्ट्रात कार्य केले आहे. गेली 10 वर्षापासून तळागाळातील जनतेशी अति उत्तम जनसंपर्क आहे. २०१४ मधे बारामती आंदोलन मधे महिला नेतृत्व म्हणून महिलांमध्ये,युवकांमध्ये मोठी जागृती त्यांनी केली. महाराष्ट्रात युवक व महिलांचे चांगले संघटन व जनसंपर्क त्यांच्याकडे आहे. ओबीसी चेहरा म्हणून परिचित असणाऱ्या महिला कल्याणी ताई वाघमोडे यांना त्यांच्या कार्यासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्यासाठी बळ मिळावे , हीच अपेक्षा .
क्रांती शौर्य सेना च्या संस्थापक अध्यक्षा,महिलांचा आवाज, तळागाळातील जनतेशी सामाजिक बांधिलकी जपणारा ,धनगर समाजाच्या आक्रमक नेत्या, आमच्या मार्गदर्शका,आमचे प्रेरणा स्थान,स्पिरिट क्वीन कल्याणी ताई यांच्या कार्यावर विश्वास आहे. त्यांच्या कार्यात मोठा त्याग आहे.कल्याणी ताई चे कार्य तळागाळात पसरलेले आहे.