राजकुमार कांगणे प्रतिनिधी तळणी
शासनाच्या आदेशाची वाट न पाहता आपत्ती व्यवस्थापननुसार अतिवृष्टीग्रस्त भागाचे पंचनामे करा मदत द्यायची किंवा नाही ते सरकार ठरवेल - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनाला सूचना.मागील आठ ते दहा दिवसांपासून मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून पावसामुळे नुकतीच पेरणी करण्यात आलेले सोयाबीन सह इतर पिके पिवळी पडत असून शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे
अगोदरच शेतकरी संकटात असताना पुन्हा अस्मानी संकटाने देखील शेतकऱ्यांवर खूप मोठा आघात केला आहे अशा परिस्थितीत अतिवृष्टीग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यात यावी अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
