प्रतिनिधी दत्तात्रेय शेळके बोरगाव
जालना येथील शेतकरी वर्गरोहि जंगली प्राण्यांपासून अतिशय त्रस्त झालेले आहेत हा प्राणी घोडा या आकाराचा असून शेतकऱ्यांनी नेमकेच केलेल्या सोयाबीन तूर मूग उडीद यांना समूळ नष्ट करीत आहे बोरगाव शिवारामध्ये हे रोही जवळपास 500 च्या पुढे असून त्यातील एक जरी कळप शेतात गेला तर तासाभरात आठ दहा एकर शेती मधील माळ रोही ही जात समूळ नष्ट करते ही एक गंभीर अशी बाब आहे तरी वन विभागाने याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही गंभीर बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे व या जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा.
कारण शेतकऱ्यांना दिवसभर शेतात मेहनत करावी लागते व रात्री रात्रभर शेतात जागरण करावे लागते अगोदरच निसर्ग कोपले ला असून जी थोडीफार पेरणी झालेली आहे ती ही रोही पूर्णतः नष्ट करत आहे हे वनविभागाने लक्षात घेणे खूप गरजेचे आहे वनविभागाने याची चौकशी करून रोही जंगली प्राण्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी बोरगाव येथील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे