किरन वाघ
जिल्ह्यातील मेंढपाळांना सराई साठी क्षेत्र उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी ऑल इंडिया मल्हार नवयुवक सेनेच्या वतीने 27 जुलै रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली दिलेल्या निवेदनात नमूद आहे की जिल्ह्यातील धनगर समाजाच्या वंशपरंपरागत शेळी व मेंढी पालन व्यवसायावर कोरोना महामारी मुळे सरित संकट ओढवले असून त्यातच भर म्हणून की काय वन विभागाकडून मेंढपाळांवर मेंढपाळांना सराई वर बंदी घालण्याचे प्रकार झाले आहेत व होत आहेत त्यामुळे मेंढपाळ बांधवांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनवून त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे तेव्हा त्या बाबींचा विचार करून उपवन विभागीय अधिकारी यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन पिढीजात शेळी-मेंढीपालन व्यवसाय करणाऱ्या धनगर समाजातील धनगर बांधवांना उपजीविकेच्या दृष्टीने चराईसाठी जागा उपलब्ध करून द्याव्यात तसेच एका कुटुंबाला शंभर पासेस उपलब्ध करून देण्यात यावे व बंदुकीचा परवाना देण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे अशा प्रकारे वेळोवेळी अन्याय होत राहिल्यास ऑल इंडिया मल्हार नवयुग सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा येईल असा इशारा निवेदनाच्या शेवटी देण्यात आल्या नियोजनावर ऑल इंडिया मल्हार नवयुवक सेना प्रदेशाध्यक्ष नंदू भाऊ लवंगे पल्लू गाडेकर सागर चिंचोळकर या आदींच्या च्या स्वाक्षऱ्या आहेत
