भीमराव चाटे प्रतिनिधी देऊळगाव राजा
वनरक्षक ग्रीन आर्मी सैनिक मित्र विद्यार्थी मित्र प्र शि क शिक्षक मित्र यांकडून सर्व स्तरावर वन्यजीव सप्ताहानिमित्त अलग अलग उपक्रम केले जात आहेत, स्पर्धा ठेवल्या जात आहेत ,कोणत्याही गोष्टीचे औचित्य साधून झाड लावून आहे एक सेलिब्रेशन करायचं . जन्म, वाढदिवस ,मृत्यू तेरवी महापुरुषांच्या जयंती ,पुण्यतिथी, शहीद सैनिक अमर हुतात्म्यांच्या तिथी, गावोगावच्या यात्रा आदि महोत्सव यांचे औचित्य साधून झाडे लावावी व संगोपन संरक्षणाची शपथ घ्यावी.
आपण जन्माला आल्यानंतर दरवर्षी वाढदिवस साजरा करण्यासाठी किती आटापिटा करतो , तसाच झाड लावण्याचे संगोपन संरक्षण करण्याचे सेलिब्रेशन करून बघा, आयुष्यात खूप आनंद येईल, आणि हे जग सुंदर असण्याचा आवाज अनुभव येईल. यावर्षी प्रदूषण कमी झाले त्याचा प्रत्यय म्हणून पाऊस वाढला आपण हिमालय, ग्लेशियर दूरवरून चमकला . झाडे लावली अन जंगल वाढवले ,जंगलातले प्राण्यांचे संरक्षण केले म्हणजेच त्यांना इजा नाही पोहोचवली इतके खूप आहे.
जर का एखाद्या वेळेस जंगलातील वन्य प्राण्यांनी आपल्या शेतातील पीक उद्ध्वस्त केले तर त्या शेतकऱ्यास नाराज होऊन त्या प्राण्यांचा बदला घेणे किंवा त्यांना विषारी औषध देणे हाय होल्टेज विद्युत शॉक देणे अशा घटना घडतात, ते टाळावे त्यांना झालेल्या नुकसान भरपाई देण्यास वन विभाग सक्षम आहे याची जानकारी दारोदारी जाऊन ग्रीन आर्मी वन मित्र वनरक्षक वनपाल वन अधिकारी वेळोवेळी गावागावात देत असतात त्यांच्या जनजागृतीचे उपक्रम देशभर चालू आहे.
निष्पाप प्राण्यांच्या हत्येचे कारण आपण घडू नये आपल्या पाळीव प्राण्यावर जर खरोखर वन्यप्राण्यांनी हमला केला असेल तर त्याची तात्काळ सूचना वन विभागाकडे द्यावी ते पंचनामा करून तुम्हाला मदत करतील व गायला अवस्थेत सापडलेल्या वन्यप्राणी याचीसुद्धा तत्काळ सूचना वन विभागाचे कर्मचारी यांना द्यावी की जनजागृती सर्व मित्रांकडून सैनिक मित्रांकडून विद्यार्थी मित्रांकडून आणि शिक्षक मित्रांकडून ग्रीन आर्मी या माध्यमातून वन्यजीव सप्ताह निमित्त सर्वांना कळविण्यात येत आहे वनरक्षक प्रशिक्षक भिमराव चाटे जय हिंद