जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील गारखेडा गावाजवळ लाकुड वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेने प्याजो रिक्षा तील तीन जनाचा मृत्यू झाला असून तर बारा प्रवासी जखमी झाल्याची घटना आज घडली आहे जामनेर ते गारखेडा रस्त्याच्या अपघात झाला असून ओल्या लाकडाने भरलेल्या mh 216045 आयशर ट्रक भुसावळ कडून प्रवासी घेऊन येत असलेल्या प्याजो रिक्षा mh 19ae9158 यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन प्याजो रिक्षा तील तीन जण जागीच मृत्युमुखी पडले आहे.
तर बारा जण जखमी झाले असून या सर्व जखमींना स्थानिक गावकऱ्यांनी मदत करून जामनेर येथील शासकीय रुग्णालयात भरती करून प्राथमिक उपचार सुरू असून तर गंभीर जखमी झालेल्या सर्व प्रवाशांना जळगाव येथे उपचार सरकारी दवाखान्यात हलविण्यात आले आहे या घटनेची माहिती कळताच जामनेर पोलीस निरीक्षक किरण शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व प्रवाशांना सहकार्य केले